Home संगमनेर संगमनेर तालुक्यात पाणी पेटले, आम्हाला आधी गोळ्या घाला, मगच पाणी घेऊन जा….संतप्त...

संगमनेर तालुक्यात पाणी पेटले, आम्हाला आधी गोळ्या घाला, मगच पाणी घेऊन जा….संतप्त शेतकरी

Breaking News | Sangamner: “आम्हाला आधी गोळ्या घाला, मगच पाणी घेऊन जा,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. निमगाव बुद्रुक (ता. संगमनेर) येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन.

Sangamner Talukyat Paani Petle, pour half the bullets for us

संगमनेर : तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांवर प्रशासनाने पोलिसी यंत्रणा लावून पाईप काढल्याने वाद निर्माण झाला. या घटनेने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.

“आम्हाला आधी गोळ्या घाला, मगच पाणी घेऊन जा,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. निमगाव बुद्रुक (ता. संगमनेर) येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढल्याने शेतीसाठी व जनावरांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्यांनी कालव्यात थेट पाईप टाकून पाणी घेतले. परंतु दोन दिवसांपूर्वीच हे पाईप फोडून टाकले. त्यानंतर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासन मिळवले. मात्र आश्वासनानंतर अवघ्या दोन दिवसांतच जलसंपदा विभागाने आपली भूमिका पलटवली आणि पोलिस बंदोबस्तासह पाईप काढण्याची मोहीम पुन्हा सुरु केली. त्यामुळे पुन्हा संघर्ष पेटला.

‘निळवंडे धरण आणि कालव्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जनतेने पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचे पुनर्वसन करून घेतले. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक आणि कायदेशीर हक्क या पाण्यावर आहे. तरीदेखील त्यांच्यावर अन्याय होत असल्याने, हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरून केला जातोय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान निमगाव बुद्रुकसह तालुक्यातील अनेक गावांतून शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत असून, परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी प्रशासनाने राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहे.

“राहुरी तालुक्यात १६ किलोमीटर कालव्याच्या क्षेत्राला वीस दिवस पाणी देता, तर संगमनेरमध्ये ४८ किलोमीटर क्षेत्र असूनही त्याला साठ दिवस पाणी देणार का?” मात्र अधिकाऱ्यांनी वीस दिवसांचेच पाणी देण्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. अनेक अधिकारी परिस्थिती हाताळण्यात असमर्थ ठरले.

Breaking News: Sangamner Talukyat Paani Petle, pour half the bullets for us

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here