आनंदाची बातमी! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
Rain Alert: हवामान खात्याची माहिती, राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळणार.
मुंबई: राज्यात दाखल झालेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगलेच थैमान घातले होते. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागात जरी चांगला पाऊस झाला असला, तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
Web Title: Rain Alert Rain will increase again in the state
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App