विहिरीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Ahmednagar Suicide: विहिरीतील दगडी पायऱ्यांना दोर बांधून गळफास घेत एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना.
पाथर्डी : विहिरीतील दगडी पायऱ्यांना दोर बांधून गळफास घेत एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घडली.
वैभव लक्ष्मण पांगरे (वय ३८, रा. वडगाव, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सेवा सोसायटीचे कर्ज डोक्यावर असल्याने पांगरे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पांगरे यांच्या वडिलांनी सेवा सोसायटीकडून साडेतीन लाख रुपयांच्या आसपास कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता पांगरे यांना लागली होती.
या काळजीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. पांगरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असून, सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात पोलिस कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली ठाण्यात नव्हती.
Web Title: Farmer’s suicide by hanging himself in a well
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App