राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, काही भागांना येलो अलर्ट
पुणे | Weather alert: कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस होत आहे. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे.
१६ ऑगस्ट पासून राज्यांत बहुतांश भागात पाउस पुन्हा सक्रीय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वार्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर
Web Title: Weather alert rain will be started