अवकाळी पावसाने पिके झाली जमीनदोस्त, उन्हाळी कांदा, चारा पिकांनाही फटका
Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने उन्हाळी कांदा, कोथिंबिरीचे नुकसान, चारा पिकांनाही फटका.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठवडयापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाने पश्चिमेकडील अनेक फांमध्ये उन्हाळी कांदा, कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांसाठी घेतलेल्या चारा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अचानक आभाळ दाटून येऊन अनेक गाठांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून पिकांचे नुकसान होत आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्याच्या पश्चिमेकडील संगमनेर खुर्द, खांडगाव,गुंजाळवाडी, राजापूर, निमज, निमगात खुर्द, सावरचोळ, मॅगाळवाडी, पेमगिरी, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्धक, कौठे धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. मे महिन्याच्या पहिल्या आठवतचात अतिशय उष्ण वातावरण होते. दुसऱ्या आठवडद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनी कांदा, कोंथिविर, भुईमूग, चवळी, टोमॅटो आदी पिकांची लागवड केली होती. अवकाळी पावसाने कांदा आणि कोथिंबीर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी सांगितले अवकाळी पावसाचे वातावरण असताना शेतकऱ्यांनी कांदा काढायला सुरुवात केली, मात्र, कांदा काढताना तो भिजला. काही प्रमाणात शिल्लक राहिलेला कांदा काढण्यात आला. शेतातच साठवणूक करत तो ताहपत्रीखाली हाकला. मात्र, पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हाकलेल्या कांद्याला देखील पाणी लागून शेतकयांचे नुकसान झाले
दुग्ध व्यवसायाला फटका
संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, अवकाळी पावसाने जनावरांसाठी केलेल्या चारा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला देखील फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
कोथिंबीर पिवळी पडली
अवकाळी पावसाने शेतातील कोथिबीर भिजून ती मोठ्या प्रमाणात पिवळी पडली आहे, ती काढून फेकून देण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी शेतातील कोथिबीर सडती आहे.
Web Title: Unseasonal rains destroy crops, summer onion