….अन् इथेच नियतीने घात केला, क्षणात सहा जणांचा मृत्यू, भीषण अपघात
Breaking News | Beed Accident: महामार्गावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक देत अक्षरक्ष: चिरडत नेलं आणि यात त्या सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू.
Beed Accident News : बीड जिल्ह्यासाठी आजची म्हणजेच मंगळवारची (27 मे) सकाळ एका अतिशय दुर्दैवी बातमीने उजाडली आहे. यात बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नियतीच्या या खेळात एका अपघातामधून बचावलेल्या सहा जणांना दुसऱ्याच क्षणात भरधाव ट्रकनं बेदरकारपणे अक्षरक्ष: चिरडलं आहे. त्यामुळे एकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या 6 मित्रांचा नियतीने अखेर ठरल्याप्रमाणेच शेवट केला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झालाय. तसचे जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावरुन एका एसयूव्ही कार मधून सहा जण प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने गाडी भरधाव वेगाने जात होती. मात्र अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. यावेळी कारमधील काहींना किरकोळ मार बसला. मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. अशातच डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले आणि इथेच नियतीने घात केला. या दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक देत अक्षरक्ष: चिरडत नेलं आणि यात त्या सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेत कारचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस या ट्रक चालकाचाही शोध घेत आहे.
Breaking News: Six people died in an instant, terrible accident