शेतकरी संप ५ जुनपासून अधिक तीव्र होणार
शेतकरी संप ५ जुनपासून अधिक तीव्र होणार
मुंबई: शेती माल व दुधाला योग्य भाव तसेच संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी राज्यात १ जूनपासून शेतकरी संप सुरु आहे. हा संप ५ जूनपासून अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भाजीपाला पाठविला जाणार नाही. राज्यात बाजार समित्या बंद ठेवणार असल्याची माहिती किसान क्रांती आंदोलनाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी रविवारी माहिती दिली, त्यामुळे या संपाची तीव्रता आणखी वाढणार आहे असे दिसू लागले आहे.
किसान क्रांती जन आंदोलन कोअर कमिटी सदस्य कमला सावंत , विजय काकडे यांनी रविवारी नगरला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आता केवळ हे जन आंदोलन महाराष्ट्रात होत नसून ते मध्यप्रदेश, पंजाब सह इतर बावीस राज्यात शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहे. या अगोदर महाराष्ट्र वगळता इतर राज्य आंदोलन तीव्र झालेले आहे. महाराष्ट्रात ५ जून पासून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मागील तीन दिवसापासून संप तीव्र करण्यात आलेला नव्हता.
आता शेतकर्यांना विश्वासात घेऊन रणनीती आखण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करावाच लागणार असे सावंत यांनी जाहीर केले.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
See: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam