Home संगमनेर संगमनेर: शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

संगमनेर: शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे बाहेर निघता न आल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Sangamner Youth dies after drowning in farm news.jpeg

संगमनेर: शेततळ्यावर गेला असताना पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे बाहेर निघता न आल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली.

सागर दत्तु वलवे (वय २२) असे या शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत सागर हा नेहमीप्रमाणे शेततळ्यावर गेला होता. मात्र येथील प्लॅस्टिक कागदावरुन त्याचा पाय सटकला आणि तो पाण्यात पडला. त्याला वेळेत बाहेर पडता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद झाली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहे.

Web Title: Sangamner Youth dies after drowning in farm

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here