मुंबई असुरक्षितच्या वक्तव्यावरून रेणुका शहाणे यांनी अमृता फडवणीस यांना सुनाविले
मुंबई: सद्यस्थितीत मुंबई सुरक्षित वाटत नाही, असुरक्षितेची भावना निर्माण होते असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी केलं होत. या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडवणीस यांना टोला लगाविला आहे.
याबाबत रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री कार्यकालाची आठवण करून दिली आहे. देवेंद्रच्या काळात एलफिन्स्टन पूल कोसळला होता. यात अनेकांचे जीव गेले होते. तेव्हा अमृता फडवणीस यांना मुंबई असुरक्षित वाटली नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
सुशांत आत्महत्या तपासाप्रकरणी मुंबईने माणुसकी गमावली असे अमृता फडवणीस म्हणाल्या होत्या. मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नाही असे त्यांनी ट्वीट केल होतं.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Renuka Shahane told Amrita Fadavanis about the statement