Rain Alert: राज्यात या जिल्ह्यांत पुन्हा पावसाचा इशारा
मुंबई | Rain Alert: राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर विदर्भात रविवारी जोरदार पाऊस कोसळला. देशातील विक्रमी तापमान विदर्भात असल्याने पावसामुळे काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: rain Alert again in these districts of the state