अहिल्यानगर: वाढदिवसाच्या दिवशी कारच्या अपघातात मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: सिन्नर बायपासवर पुलावर आल्यावर कारचा पुढचा टायर फुटल्यामुळे पुलाचे कठडे तोडून कार खाली खोल खड्ड्यात पलटी.
राहाता: वाढदिवसाच्या दिवशी राहात्यातील युवकावर काळाचा घाला घातला. कार अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राहाता शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल बापुराव जंगम यांचा मुलगा शिवम् हा नाशिक येथे फायनान्स कंपनीमध्ये नोकरीस होता. त्याचा शनिवारी वाढदिवस होता, त्यामुळे तो शुक्रवारी रात्री राहात्याकडे येण्यासाठी निघाला. रात्री 1:30 ते 2 च्या दरम्यान सिन्नर बायपासवर पुलावर आल्यावर कारचा पुढचा टायर फुटल्यामुळे पुलाचे कठडे तोडून कार खाली खोल खड्ड्यात पलटी झाली. त्याच्या डोक्यात मार लागल्याने अती रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध झाला.
रस्त्यावर भरपूर वाहने गेली, परंतु कोणीही मदतीसाठी थांबले नाही. अखेर 3 वाजता ट्रक चालकाच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी सिन्नर पोलिसांना संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन शिवम् याला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा पूर्वीच तो मयत झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोलिसांनी मालकाचा शोध घेतल्यानंतर अनिल जंगम यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. सिन्नर येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आला. नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. शिवम् यांच्या पश्चात आई, वडील आणि एक बहिण असा परिवार आहे.
Breaking News: Death in a car accident on birthday