Home अकोले तालुक्यातील कोव्हीड रूग्णसंख्य्या नियंत्रणात आणणे हाच अकोलेकरांंसाठी एकमेव उत्तम पर्याय उपलब्ध: मुकेश...

तालुक्यातील कोव्हीड रूग्णसंख्य्या नियंत्रणात आणणे हाच अकोलेकरांंसाठी एकमेव उत्तम पर्याय उपलब्ध: मुकेश कांबळे

Akolekars is to control the number of patients Mukesh Kamble

प्रतिनिधी | अकोले:  अकोले तालुक्यातील कोरोना व्हायरस संसर्ग बाधितांच्या संख्येने हजारी पार केली असून सर्व मोठ्या गावांतून कोव्हीड तपासणी केंद्र सुरू करण्यात यावीत. तसेच कोव्हीड पॅाझिटीव्ह रूग्णांना उपचारांसाठी संगमनेर व अन्यत्र दाखल करण्याऐवजी अकोल्यातच कोव्हीड हॉस्पिटल सुरू केल्यास आज अकोले तालुक्यातील रूग्णांची होत असलेली हेळसांड टाळता येईल यासाठी अकोल्यातच कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे,  अशी मागणी अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर, अध्यक्ष हेमंत आवारी, विश्वस्त दामोदर वैद्य, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, शांताराम काळे, नाईकवाडी यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना शिष्टमंडळाने भेटून चर्चेतून केली. यावेळी अकोले नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ.विक्रम जगदाळे उपस्थित होते. तालुक्यातील कोव्हीड रूग्णसंख्य्या नियंत्रणात आणणे हाच अकोलेकरांंसाठी एकमेव उत्तम पर्याय उपलब्ध असल्याचे मत तहसीलदार कांबळे यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केले.

या संदर्भातील अकोले तालुका पत्रकार संघाने तहसीलदाराना निवेदनही दिले. मात्र याबाबत झालेल्या चर्चेत तहसीलदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याऐवजी यासाठी अकोले तालुक्यात अपुरी  शासकीय आरोग्यसेवा व प्राप्त यंत्रणेत एम.डी. मेडिसिन फिजिशियन सेेेवेत नसल्याने अकोल्यात ‘कोव्हीड हॉस्पिटल’ सुरू करणे केवळ अशक्य असल्याचे लक्षात आणून देत प्रशासनाची हतबलता व्यक्त केली. त्यामुळे यापुढील काळात तरी अकोले तालुक्यातील रूग्णसंख्य्या नियंत्रणात आणणे हाच अकोलेकरांंसाठी एकमेव उत्तम पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळेच अकोल्यात दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या कोव्हीड रूग्णांवर सर्व स्तरावरून नियंत्रण आणले नाहीतर तालुक्यातील जनतेसमोर अत्यंत भिषण परिस्थिती निर्माण होऊ शकेल. याबाबत तालुक्याल कोव्हीड रूग्णसंंख्या अशीच हाताबाहेर जात राहील्यास अकोलेकरांसाठीची उपलब्ध आरोग्यसेवा केवळ रामभरोसे असल्याचे दिसून येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे.

तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, अकोले ताक्यात कोरोना रुग्ण संख्येने 1000 चा टप्पा पूर्ण केला असल्याने तालुक्यात कोव्हीड सेंटर उभारणे गरजेचे आहे. तसेच सर्व स्तरावरून अँटिजेंट टेस्ट वाढविणे आवश्यक आहे. बाधित पत्रकारांसाठी राखीव बेड्सची व्यवस्था करून  त्यांच्या उपचाराला प्राधान्यक्रम द्यावा व तालुक्यातील विविध भागात उपचार केंद्र सुरू करण्यात यावीत. याबरोबरच तालुक्यातील एकूणच कोव्हीड परिस्थितीवर सामाजिक भावनेतून काम करीत असतानाच शासनाकडून गोरगरीब जनतेच्या कुटुंबासाठी देण्यात येत असलेल्या अन्नधान्याचा काळाबाजार रोखण्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रशासनाकडून कारवाई करावी. अकोले पोलिसांकडूनच पकडण्यात आलेला व जप्त केलेला शासकीय गोदामातील तांदूळ आरोपीसह विनाकारवाई सोडून देण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.

अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात हे निवेदन आले, यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर, विश्वस्त डी.के. वैद्य, अध्यक्ष हेमंत आवारी, संपर्क प्रमुख विद्याचंद्र सातपुते, जेष्ठ पत्रकार शांताराम काळे, अनिल नाईकवाडी यांनी तालुक्यातील कोरोनाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधून सकारात्मक चर्चा केली. यावेळी तहसीलदार कांबळे पुढे म्हणाले की, अकोले, कोतूळ, ब्राह्मणवाडा, देेवठाण, समशेरपूर, राजूर, शेंडी या ठिकाणी अँटिजेंट टेस्टची सुविधा असून इतर ठिकाणी लवकरच या टेस्ट करण्याची सुविधा करण्यात येईल. शासनाच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेंतर्गत 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत तालुक्यातील सर्व गावांतूून सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यात थर्मल चेकिंग, ऑक्सिजन तपासणी, कुटुंबात कोणाला व कोणते आजार आहेत त्याची माहिती व त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रशासनाच्या दोन व्यक्ती व एक गावातील एक समन्वयक अशी तिघांची टीम नियुक्त  करण्यात येत आहे. एकाच वेळी गावांतून 50 कुटुंबाची तपासणी केली जाणार आहे. मास्क न वापरण्यावर कायदेशीर कारवाई करणार 188 कलमानये गुन्हे दाखल होऊ शकतात. तसे झाल्यास तर त्या व्यक्तीला कोर्टाकडून दंड झाल्यास भविष्यात पारपत्र व परदेशी जाण्याचा व्हिसा मिळनार नाही, अशीही माहिती दिली.

सध्या कोव्हीड रूग्णांना तालुक्यात पुरेसे बेड्स उपलब्ध असून अगस्ति साखर कारखाना 100 नंतर अजून 50 बेड्सची सुविधा करणार आहे. सर्व नागरिकांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टन्सनिंग नियमांचे पालन करावेत, कामाशिवाय बाहेर न पडणे, आपली काळजी आपणच घेणे असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले. मुख्याधिकारी जगदाळे यांनी मास्क न वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूतोवाच केले. अकोल्यात व राजूर येथून व्यापारीवर्गाने स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले सहकार्य केले आहे. अकोले शहरात लवकरच निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. संपर्क प्रमुख विद्याचंद्र सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akolekars is to control the number of patients Mukesh Kamble

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here