सावधान! अकोलेत कृषी केंद्रावर छापा, खताचा मोठा साठा जप्त
Breaking News | Akole Raid: छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत युरिया खत साठा आढळून आणला.
अकोले: जिल्हा स्तरीय भरारी पथकाने अकोले तालुक्यातील मे. जय संतोषी माता कृषी सेवा केंद्र, धामणगाव पाट येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत युरिया खत साठा आढळून आणला. तपासणी दरम्यान ई-पॉस प्रणालीत फेरबदल करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आणि कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने कृषी विक्रेत्यांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्या कृषी सेवा केंद्रात साठा पुस्तक अद्ययावत नी नसल्याचे आंढळले. तसेच खरेदी बिले नसून फक्त चलन असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासणी दरम्यान युरिया खताचा साठा गोदामात नसल्याचे आढळले, मात्र ई-पॉस प्रणालीत १.९३५ मे. टन (४३ गोर्णी) साठा शिल्लक असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता ई-पॉस प्रणालीत फेरबदल करून प्रत्यक्ष विक्री न करता साठा कमी केल्याचे आढळले यातूनच शासनाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. भरारी पथकाने शेजारील घराची पाहणी केली असता ३४.२४५ मे. टन (७६१ गोणी) युरिया खताचा साठा आढळून आला. हा साठा प्ररवान्यात समाविष्ट नसलेल्या जागेत ठेवण्यात आला होता.
या कारवाईत खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांचा भंग झाल्याचे आढळले. त्यामुळे दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रातील अनियमितता आणि शासनाच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला.
भात लागवडीला खताची टंचाई
एकीकडे काही कृषी केंद्राकडून खतांची साठेबाजी केली जात आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून, भात लागवडीसाठी युरिया खताची मोठी गरज भासत आहे. मात्र, काही दिवसांपासून युरिया खतांचा तुटवडा भासत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर खत न मिळाल्यामुळे पेरण्यांमध्ये विलंब होत असून, याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासी भागात अगोदर अवकाळी पाऊस आणि आता सुरू झालेला मोसमी पाऊस यामुळे दळणवळणाची अपुरी साधने तर तुटणारा संपर्क यामुळे शेतकऱ्यांना खते नेण्यास मुश्किल होईल यासाठी तात्काळ खतांचे वाटप करावेत.
Breaking News: Raid on Akole agricultural center, large stock of fertilizer seized