संगमनेर: शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
Breaking News | Sangamner: शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील म्हसोबा मळ्यातील खिराळ बस्तीबर राहणारे विठ्ठल निवृत्ती गुंजाळ (वय ४५) या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
विठ्ठलगुंजाळ हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पायाचा तोल जाऊन ते विहिरीत पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी नवनाथ गुंजाळ यांचा मुलगा चारा आणण्यासाठी शेतात गेला असता, त्याला विहिरीजवळ एका खोक्यात बॅटरी आढळली. त्यामुळे त्याने विहिरीत पाहिले असता पाण्याबर एक मृतदेह तरंगताना दिसला. त्याने तात्काळ बडिलांना याची माहिती दिली.
विठ्ठल गुंजाळ हे व्यवसायाने मोटार रिवाइंडिंगचे काम करत होते. ते ‘विठ्ठल फिटर’ या नावाने तालुक्यात ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ, बहीण व आई असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील छायाताई गुंजाळ, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पगारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र दगडू रुपवते यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी खोल विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे कठीण काम यशस्वीरित्या पार पाडले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी येथे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. सरपंच विकास गुंजाळ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. विठ्ठल गुंजाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Breaking News: unfortunate death of shetkriyacha