अहमदनगर: गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तलावात बुडून मृत्यू
Breaking News | Ahmednagar: कॉलनीतील नागरिकांसोबत घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तलावात बुडून मृत्यू.
अहमदनगर : कॉलनीतील नागरिकांसोबत घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगर- मनमाड रोडवरील विळद चौकातील तलावात घडली.
अजिंक्य बाबासाहेब नवले (वय १६) व केतन मोहन शिंदे (वय १८, दोघे रा. म्हसोबा चौक, बोल्हेगाव, नगर) अशी मयत मुलांची नावे आहेत. अजिंक्य नवले केतन शिंदे बोल्हेगाव येथील म्हसोबा चौकातील नागरिक गणपती विसर्जनासाठी मंगळवारी सायंकाळी नगर- मनमाड रोडवरील विळदघाट परिसरातील तलावात गेले होते. त्यांच्यासोबत अजिंक्य व केतन, हे दोघेही गेले. त्यांनी तलावात घरच्या गणपतीचे विसर्जन केले. बाप्पांना निरोप दिल्यानंतर यातील एकजण पाय धुण्यासाठी तलावात उतरला. त्याचा पाय घसरल्याने दुसऱ्याने त्याला वाचविण्यासाठी हात पुढे केला. दोघांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. दरम्यान, नागरिक व पोलिसांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दोघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
Web Title: Two children who had gone to bathe Lord Ganesha drowned in the lake
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study