मित्रांसोबत गेला तो घरी आलाच नाही, पाण्यात बुडवून मारलं, बीडमधील घटना
Beed Murder Case: तरुणाचा त्याच्या मित्रांनी खून केला परंतु तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला.
बीड : आवादा कंपनीच्या खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी असताना आता पाटोद्यातील खून प्रकरण समोर आले आहे. सौरभ भोंडवे या तरुणाचा त्याच्या मित्रांनी खून केला परंतु तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. भोंगवे कुटुंबाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना याचसंदर्भाने पत्र लिहिले आहे.
मित्रांबरोबर बाहेर गेलेल्या सौरभला मी सायंकाळी फोन केला. त्यावेळी त्याचा फोन मित्रांनी उचलला, पण त्यानंतर केलेल्या कोणत्याही फोनला समोरून प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या मित्रांनीच त्याला तलावाच्या पाण्यात बुडवून मारला पण जातीयवादी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असा गंभीर आरोप सौरभच्या आईने केला आहे.
मयत झालेल्या तरुणाचे नाव सौरभ शिवाजी भोंडवे असून २८ वर्षीय सौरभला ४ वर्षाचा मुलगा होता. मित्रांबरोबर तो घराबाहेर पडला. सायंकाळी ६.१४ मिनिटाने त्याच्या आईने फोन केला. आजूबाजूला खूप आवाज येत होता. पुन्हा फोन उचलला जात नाही. रात्री हेच मित्र पोलिस स्टेशनला जातात. तिथे सौरभचे वडील भेटल्यावर तिघेही वेगवेगळी उत्तरं देतात आणि दोन दिवस खूप शोध घेतल्यावर प्रेत मिळते. तलावात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. १५ तारखेला अंत्यविधी होतो. पोलिस कंप्लेंट (FIR) घेतली जात नाही. पोलीस निरीक्षक अनमोल केदार त्यांना म्हणतात एसपींना भेटा, नाहीतर कुठही जा. अशी संपूर्ण घटना अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून कथन केली आहे.
परळी पॅटर्न महाराष्ट्रासमोर आणलेले आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरून पाटोदा खुनाची फक्त लेखी तक्रार पोलिसांनी घेतली आहे. ५ महिने झाले तरी अजून न्याय मिळत नाही. कुणाच्या सांगण्यामुळे ही तक्रार घेतली गेली नाही? याचे प्रश्नाचे उत्तर पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना द्यावे लागेल, असे दमानिया म्हणाल्या.
Web Title: He went with his friends and did not come home, drowned in water
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News