अहमदनगर: दोन सख्ख्या बहिणीचे अपहरण
Breaking News | Ahmednagar: एक १७ वर्षाची व दुसरी १६ वर्षाची सख्ख्या बहिणीचे अपहरण झाल्याची घटना.
श्रीरामपूर : सध्या जिल्ह्यात अत्याचार, खून दरोडे, अल्पवयीन मुलीचे अपहरण या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. श्रीरामपूर शहरातील एका परिवारातल्या दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तर राहुरी शहरातून एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो फसला.
श्रीरामपूर शहरातील एका परिवारातल्या दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, या दोन्ही मुली दुकानात जाऊन येतो असे सांगून बाहेर होत्या.बराच वेळ झाल्यानंतर देखील त्या परत घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा परिसरात शोध घेतला मात्र त्या आढळून आल्या नाहीत. यातील एक १७ वर्षाची व दुसरी १६ वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे. दोघीही बहिणी-बहिणी आहेत.
Web Title: Kidnapping of two sisters
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study